
या वेळी अधिवक्ता गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘भारतातील पवित्र गंगाजलात आढळणारा बॅक्टेरियाफॉज हा विषाणू अनेक आजार निर्माण करणार्या जिवाणूंंना मारतो, हे अनेकदा वैज्ञानिक संशोधनातून समोर आलेले आहे. त्यामुळे आम्ही ‘बनारस हिंदु विश्वविद्यालया’च्या डॉक्टरांच्या साहाय्याने कोरोनावर संशोधन केले.त्यात आम्हाला यश आले आहे. गंगास्नान तथा गंगा नदीचे माहात्म्य आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथात सांगितले आहेच. ते आता वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध होत असून ते समाजापर्यंत गेले पाहिजे. आज भारतीय सरकारी संस्था या संशोधनात साहाय्य न करता अडथळा आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारतातील काही राज्यांत मृत्यूदर 40 ते 45 प्रतिशत असतांना गंगा नदीच्या किनारी राहणार्या गावांमध्ये मृत्यूचे प्रमाण 5 प्रतिशतपेक्षा कमी होते, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक होते. हे सर्व सरकारी आकडे आहेत. गंगेच्या पाण्याच्या वापरामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव होत नाही. माघमेळा तथा कुंभमेळ्याच्या वेळी 10 ते 12 कोटीच्या संख्येने लोक गंगास्नान करण्यासाठी एकत्र येतात. त्यात अनेकांना विविध प्रकारचे रोग वा चर्मरोग असतात; पण गंगास्नान केल्याने लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांतील मूलभूत घटकद्रव्ये आणि ऑक्सिजन यांचे प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या भिन्न आहे; मात्र ज्या वेळी यमुना नदीचा मोठा प्रवाह छोट्याशा गंगा नदीच्या प्रवाहात प्रयाग येथे मिसळतो. तेव्हा यमुनेतील सर्व घटकद्रव्ये ही गंगेतील घटकद्रव्याप्रमाणे होतात; म्हणून तिला पुढे गंगा नदीच म्हटले जाते. अशा एकूण 300 नद्या गंगा नदीत येऊन मिसळतात’’.

