
विदर्भ वतन न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी : विशाल गुरव
सातारा. महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ना 50 लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्ह्यावर जोरदार उठाव केला विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक.निंबाळकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देवून तातडीने पत्रकारांचा विम्याची मागणी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली त्याला सर्वात मोठा प्रतिसाद सातारा जिल्ह्याने दिला. सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यामधील पत्रकार संघाने त्या त्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिले, तर सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात विधान परिषदेचे सभापती ना रामराजे नाईक.निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, साताऱ्याची जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, आ. शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले.
आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे एका कार्यक्रमात बोलताना कोरोना युद्ध असलेले पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले तर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत देण्याची घोषणा केली होती मात्र, राज्यात 27 पत्रकारांचे बळी कोरोनाने घेतले असले तरी हे काही पत्रकाराच्या कुटुंबीयांना 50 लाखाची काय दमडीही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे सातारा जिल्ह्यातील कराडचे मोहन कुलकर्णी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने मदत करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकारांना विमा कवच देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली होती मात्र, त्याबाबतही कोणताच निर्णय सरकारने घेतला नसल्याने राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत कोविंड सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नाहीत आणि खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत आशा कात्रीत पत्रकार सापडले आहेत, योग्य उपचार न मिळाल्याने पुण्यात पांडुरंग रायकर तर माथेरानमध्ये संतोष पवार या दोन पत्रकारांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी पत्रकार संघाने केली. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी ठरल्याप्रमाणे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना मेसेज करून मागणी केली कोरोनाने मृत्यू झालेल्या दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, सुजित आंबेकर राहुल तपासे, तुषार तपासे, ओंकार कदम दीपक दिक्षित, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, चंद्रसेन जाधव, मोहन मस्कर.पाटील, सनी शिंदे, किरण मोहिते, जावेद खान, प्रकाश शिंदे, महेश शिरसागर यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते,
सभापतींनी राज्यशासनाला निर्देश द्यावेत.
राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत 27 जणांचा बळी गेला आहे घोषणेची अंमलबजावणी राज्य शासनाने केली पाहिजे, राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती म्हणून मुख्यमंत्री व राज्यसरकारला तातडीने निर्देश द्यावेतअथवा तशी बैठक बोलवावी. अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी यावेळी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक.निंबाळकर यांच्याकडे केली आपण तातडीने राज्य सरकारशी चर्चा करून असे यावेळी ना. रामराजे यांनी सांगितले.
जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये पत्रकार संघांनी आपापल्या भागातील पत्रकारांना बरोबर घेऊन फिजिकल डिस्टन्स पाळत तहसीलदार व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा या निवेदनात मांडण्यात आली तर एसएमएस व्दारे ग्रामीण भागातील हजारो पत्रकारांनी आरोग्य मंत्र्यांनाही पत्रकार विमा योजनेबाबत मेसेज केले.

