नाना पटोले यांचा स्वबळाचा पुन्हा नारा, काँग्रेस निवडणुकीत ताकदीनिशी उतरणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11449*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144

 नाना पटोले यांचा स्वबळाचा पुन्हा नारा,काँग्रेस निवडणुकीत ताकदीनिशी उतरणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई – कॉंग्रेस प्रदेशाधाक्ष नाना पटोलेंच्या स्वबळाचा आज पुनरुच्चार केला आहे. 2014 ची पुनरावृत्ती होऊ नये याचीं आम्ही काळजी घेत आहोत. आम्ही निवडणुकीत ताकदीनिशी उतरणार आहोत. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवार यांचे निमंत्रणच नव्हते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

स्वबळाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाही, हा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल. मी फक्त एवढंच सांगेन की, काल पवारांनी जे वक्तव्य केले , तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्येही घेतला होता. तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय़ होता. आमच्या पक्षाचाही काय करायचं, कसं करायचं याबद्दलचा निर्णय होईल. ती आमच्या पक्षाची रणनीती असेल.

आमच्या पक्षाची स्टॅटर्जी आहे. त्यानुसार आमचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले. ओबीसी आरक्षण जे भाजपने संपवलले आहे. त्याविरोधात आम्ही एक आंदोलन उभं करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत भूमिका केंद्राकडून स्पष्ट झाली पाहीजे. यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे नेते शरद पवारांना भेटायला गेले होते. मला तिथे आमचे नेते गेलेले माहितीही नव्हते . मला आमंत्रणही नव्हते . माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचे काम करायचे आहे. माझ्या पक्षाचे काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. हायकमांडने मला पक्ष मजबुत करण्याची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अॅटॅक करत नाही. भाजप विरोधात करतो. ते म्हणाले की, काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आजीबातच नाही, संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते.झोटिंग समितीच्या अहवालाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी बहुजन समाजाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले आहे. एकनाथ खडसेंचं याच कारणामुळे खच्चीकरण झालं आहे. एखाद्या गोष्टीचा फार्स तयार करुन त्यात लोकांना गुंतवायचं हे फडणवीसांना जमतं. झोटींग समितीचा अहवाल देखील फार्सच आहे, असे ते म्हणाले. उद्या सायकलवरुन राज्यपालांना भेटायला जाणार

नाना पटोले यांनी सांगितलं की, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर उद्या राज्यापालांना दुपारी 12 वाजता सायकल वरुन राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. हॅगींग गार्डन ते राजभवन पर्यंत सायकल रॅली काढणार आहोत, असं ते म्हणाले. सामनातील लेखाविषयी बोलताना ते म्हणाले की, सामनानं चांगलं लिहीलंय काँग्रेसच्या हिताचंच सांगितलंय. 2024 मध्ये देशात राहुल गाधींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल. नानांनी काँग्रेसला महाराष्ट्रात उभारी दिलीय असं म्हटलं आहे, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळातील काँग्रेस मंत्र्यांच्या बदल्यांबाबत अजून निर्णय नाही. मंत्रिमंडळ बदलाचे निर्णय हायकमांड घेतील, असे ते म्हणाले