नागरिकांनो नियम पाळाच! राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10609*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217

नागरिकांनो नियम पाळाच! राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर आज राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यदरही वाढला आहे. दिवसभरात १९७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे. त्यातच करोनाच्या नव्या Delta Plus Variant मुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात ७८९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ९१ हजार ६७० इतका आहे.